इराण युद्धाने खतांचे संकट का उभे राहिले नाही? — पुरवठा व्यवस्थापनाची कसोटी आणि डीएपीवरील टांगती तलवार

विजय गायकवाड २८ फेब्रुवारीपासून होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद पडली आणि अमेरिका–इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाने जागतिक ऊर्जा पुरवठ्याला असा धक्का …

मान्सून २०२६ दैनंदिन अहवाल | २६ जून — IMD ने दोन आठवड्यांचा अंदाज दिला: पहिला आठवडा कमकुवत, दुसरा आठवडा — आशेचा किरण

विजय गायकवाड | कृषी पर्व IMD ने आज (२५ जून) एक अत्यंत महत्त्वाचा १३ पानी दस्तऐवज प्रकाशित केला — “Current …

विधानसभेत आमदार लांडे यांचा सरकारला थेट आव्हान; “एक वर्ष कृषीमंत्री करा, सचिवांची मस्ती उतरवतो!”

विधानसभेत आमदार लांडे यांचा सरकारला थेट आव्हान; “एक वर्ष कृषीमंत्री करा, सचिवांची मस्ती उतरवतो!”मुंबई, दि. २३ जून २०२६ | महाराष्ट्र …

🌾 तिहेरी संकटात महाराष्ट्राचा शेतकरी

खत महाग · निर्यात बंद · पाऊस कमी — खरीप २०२६ची कठीण परीक्षा — विजय गायकवाड | krishiparva.in | मे २०२६ 🔴 प्रास्ताविक : तीन आघाड्यांवरील युद्ध महाराष्ट्रातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात एकट्या संकटाशी नाही, तर तीन आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहे. एका बाजूला इराण युद्धामुळे रासायनिक खतांच्या किमती ४०% पर्यंत भडकल्या आहेत. दुसऱ्या बाजूला सोयाबीन आणि कांदा निर्यातीवरील अनिश्चितता शेतमालाचे भाव एमएसपीच्या खाली ढकलत आहे. आणि तिसऱ्या बाजूला आयएमडीने महाराष्ट्रात यंदा सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे — मराठवाडा आणि विदर्भात ४५ ते ६५% संभाव्यता आहे की पाऊस कमी राहील. हे तीन संकट एकत्र आले की शेतकऱ्यासमोर एकच प्रश्न उरतो : मी खरीप पेरू का? आणि पेरलो तर कमाई होईल का? 🧨 पहिला आघाडी : खत महागले, सरकार गप्प इराण युद्धाचा थेट धक्का भारताच्या खतबाजाराला एप्रिल २०२६ मध्ये अमेरिका-इस्राईल-इराण संघर्षाने होर्मुझ सामुद्रधुनी अस्थिर केली. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा खत आयातदार देश आहे आणि आपल्या एकूण खत आयातीपैकी सुमारे २०-२५% आखाती देशांमधून येते. या एकाच घटनेने देशातील खताची साखळी हादरली. 📊 किमतींचे वास्तव (मे २०२६ स्थिती) : खत पूर्वीची किंमत (प्रती ५० किलो) आजची किंमत वाढ DAP (डीएपी) ₹१,३०० ₹२,१०० – ₹२,२०० ~+७०% युरिया (अधिकृत) ₹२६६-₹२८० काळ्या बाजारात ₹१,१००-₹१,२०० …